Posts

RaajGad - A Trek part 1

After much deliberation , and many attempts to have many people on board , we decided 3 is enough (kapil , mandar and me that is btw),let us go to Rajgad. Date was decided , 9th August it was. Basic planning was done, it was as basic as you could get ,that is we decided only the time to leave Swargate with everything else to be decided run time.It was 7 O'clock in the morning. Kapil and me reached Swargate from Bibwewadi at 7:20 , only 20 minutes late as usual. Mone (Mandar - I will switch between Mandar and Mone as Situation demands ) was there almost right time , waiting as usual. After having Cutting and Vada Paav as energy boosters at the Bus Stand , we thought its good time to inquire about Bus that goes to Rajgad , and after some hiccups we were informed that there is some bus which goes somewhere near to Rajgad , OK we better ask conductos of each bus . There was one group of 13 youngsters standing around at the bus stop with some nice girls in there.Of course we were

माझे जगणे होते गाणे ( विडंबन )

माझे जगणे होते गाणे  ( विडंबन ) जाता जाता पिईन मी पिता पिता जाईन मी  गेल्यावरही या मैफिलितल्या  धुंदीमधुनी राहीन  मी ||  माझे  जगणे होते पिणे  कधी मनाचे कधी  जनाचे  कधी पाण्यासवे  कधी सोडयासवे जवळ चणे  फुटाणे ||  सिग्रेटीची संथ धुरावळ  वा मित्रांचा संकर गोंधळ  कायम आर्तता काळजातली  कधीच नाही बहाणे ||  ओकलो अथवा ओकलाो नाही  पोटी काही राहिले नाही  'इंग्लिश' मधील बडबडींचे होई मस्त तराणे ||  आठवणीँचे राजस गुंजन  कधी राजकारणी मंथन  जाणतेपणी अजाणतेचे  सोंग करी शहाणे || 

Few questions after a win in Lost series...

Just concluded India's tour to South Africa was unique in many perspectives. It was first major series of Virat Kohli outside sub-continent & consequently his major test.It was first series where there were realistic expectation of series win. India fought well through the series , had their moments , battled come back from 2-0 down and won last test to make it 2-1, series lost nevertheless. So what went wrong ? First of all is there anything wrong ? If you lose a hard fought series where in all 3 matches both teams had their chances till last 2 sessions of a test , we may like to believe that it was close and both teams matched each other. But the difference and Victory margins in all 3 tests suggest otherwise.If anyone has a look at scorecard 5 years down the line , one may conclude that South Africa was superior in first 2 matches by some distance and same for India in final test. And probably this is the reality and to think pitch for final test was not ideal for test

हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !

हल्ली बरेचदा असे  जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ  लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ  घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत  जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं  हळवं  होतं आणि आठवणीत रमतं .  उदा. शाईचे पेन.  स्मार्टफोन / Tab / Laptop  च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं  नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते .  पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन  उचललेल्या  किंवा रिफील न होणाऱ्या  पेनात काही आपलेपणा वाटतं  नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता. माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली . बालवाडीत असताना शिसपेन्सिल वापरल्याचे सुद्धा आठवत  नाही . तेव्हा एरवी लिहायला आणि भूक लागली तर खायला अशी  पांढरी पेन्सिलच वापरली जायची .  परीक्षा वगैरे सुद्धा ( जी नावालाच होती ) ती पाटीवरच असायची .  पहिलीत गेल्यावर शिसपेन्सिल हातात आल्याचे आठवते . जसे लहानपणाचे दिवस फार काळ  आठवणीत टिकत नाहीत त्याप्रमाणे  लिहिलेले खोडायला बरी म्हणून  शिसपेन्सिल वापरत असावेत  (नाहीतर मुले सुद्धा ब्लॉग /आठवणी लिहायला लागायची ) . वरच्या व

नमन !

वाटे तुला की, तू एकटा न संगे कोणी , दिवस सरता खायला येई , सुन्न भयाण शांतता न कळे काही , त्रस्त तु सर्वथा मग, कर तू , वाच तू, स्मर तू हे नमन , आहे हे तुजकरिता! मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता साथ मिळे तुला , जीवन एक कविता सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता असावी ही , पुस्तकातली परिकथा मग, स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला, हे नमन , आहे हे तुजकरिता!

कालाय तस्मै नम: !

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच  एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार .  मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी  रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी  बरयाच सोयी-सुविधा  मोफत  दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे  पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट  देण्यात आली .  ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता.    एकूणच सगळं  ऐटीत  चालल होतं . शहरातले  लोक सुजाण , सुशिक्षित   आणि कामसू होते.  त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या   आपल्या  संस्थेत  जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली  वागणूक मिळत असे. वातानुकुलीत दालने,  हवा तेंव्हा  आणि पाहिजे  तेंव्हा    चहा- कॉफी , सकाळ - संध्याकाळचा नाष्टा ,दुपारचे जेवण एकदम  वाजवी दारात असा शाही  थाट  होता. कामाचाही फार जास्त दबाव  नसे, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ कधीतरी ७ , शनिवार , रविवार सुट्टी  असे चालले होते.  कामही संगणकावर असल्याने शारीरिक श्रमाचा प्रश्न नव्हता. दुसरीकडे  नगरीचा विकास जोमाने होत होता . अनेक नवीन गृहप्रकल्प येथे चालू झाले . पूर्वी जी

नाटेकर

नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित   करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे   आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात  जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात  त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा  तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व  खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज  झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले. ते स्वतः खटले चालवतात.  पण नाटेकरांची खरी ओळख मला यामुळे नाही झाली , तसंही कोर्टकचेरीतलं  अजुनही विशेष कळत नाही , त्यावेळी तर बिलकुलचं नाही. आमचही गाव केळ्ये ,  तिथे त्रिपूरी पौर्णिमेचा ऊत्सव मोठ्या जोरात साजरा होतो , दिवाळीच्या   दरम्यान जी काकडे आरत चालू होते ती त्रिपूरीला संपते, आणि मग त्यादिवशी  गावजेवण असे. असाच पहिल्या पंक्तीला बसला असताना, नाटेकर समोर बसले होते, आणि जिलबीचं ताट वाढायला आलं , आग्रह